🌟मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव लोकाभिमूख करण्यासाठी सर्व सदस्यांचे योगदान मोलाचे....!


🌟नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन🌟

नांदेड, (दि.24 एप्रिल) :- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत शासनाने समितीवर जो विश्वास व्यक्त केला त्यानुसार आपला अर्जापूर येथील कार्यक्रम खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्यांनी योगदान दिले, बलिदान दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासमवेत हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधिक सन्मान करता आला. हीच कृतज्ञता अधिक दृढ करण्यासमवेत नव्यापिढी पर्यंत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रभावीपणे पोहचविण्यासाठी सर्व सदस्य पूर्ण क्षमतेने आपले योगदान देतील, असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तहसिलदार संजय वारकड, प्रविण साले, सुनील नेरलकर, दिलीप कंदकुर्ते, दिपकसिंह रावत, ज्येष्ठ गायक संजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, श्रीमती आनंदी विकास, संपादक विजय सोनवणे, डॉ. शाम तेलंग, चारुदत्त चौधरी, प्रा. निवृत्ती कौसल्ये, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखा नियामक मंडळाचे सदस्य नाथ चितळे, बापू दासरी, ॲड. गजानन पिंपरखेडे, ॲड दिलीप ठाकूर, सान्वी जेठवाणी, कृष्णा पापीनवार, आदींची उपस्थिती होती.  

यावेळी खासदार तथा समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते समितीतील सदस्य नाथा चितळे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखा नियामक मंडळाच्या सदस्य पदी निवडून आल्याबद्दल त्याचबरोबर समितीच्या सदस्या डॉ. सान्वी जेठवाणी यांची राज्य निवडणूक आयोगातर्फे आयकॉन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  

शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मराठवाडा मुक्तिचा इतिहास पोहचावा यादृष्टीने शालेय पातळीवर नाट्यस्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यातील कलावंतांच्या सहभागातून मान्यवर लेखकांची मराठवाडा मुक्तिसंदर्भातील लिहिलेली प्रकरणे अभिवाचनाच्या सहय्याने पोहचते करणे, विशेष स्मरणिका, येत्या महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रातिनिधीक स्वरुपात मराठवाडा मुक्तिचे स्मरण व्हावे या उद्देशाने राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व मराठवाडा गिताचे समुहिक गायन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या