💥राजापुरचे मयत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत.....!


💥वारीशें यांच्या मुलास नोकरी देखील देण्याची उद्योग मंत्री उदय सामंत घोषणा💥                            

✍️ मोहन चौकेकर

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले होते त्यामुळे या वारिशे कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद व  पत्रकार अन्य संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.


आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वीकारली आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या