💥प्रेममयी शांततापूर्ण मार्गाने मानवता केंद्रीत मनमंदिराची उभारणी करा - कुलगुरू डॉ इंद्र मणी


💥शिक्षणातून सुंदर संस्कार होत माणूस विचारी बनतो.चांगल्या वाईटातील फरक कळू लागतो💥

भारतीय लोकजीवनात स्त्री पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून तिचा सन्मान करणे तिला आदराने वागवणे ही आचार रीती भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी आहे.श्रमाला प्रतिष्ठा देत परिवार आणि परिस्थितीला चांगलं वळण देणारी ती अद्वितीय योध्दा  आहे.प्रेममयी,शांततापूर्ण मार्गाने मानवता केंद्रीत मनमंदिराची उभारणी करणारी संस्कारक्षम संस्कृती कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या शिक्षणातून विकसित होत आहे.विद्यार्थिनींसाठी शिक्षण आणि शिक्षणातून महिला सक्षमीकरण या उदात्त हेतूने १९८३ पासून आजतागायत हे महाविद्यालय यशस्वी वाटचाल करीत आहे.आज तुमच्या जीवनातील पदवी वितरण सोहळा आनंददायी तितकाच प्रेरणादायी आहे.शिक्षणातून सजग राहात अन्यायाचा प्रतिकार करत न्यायासाठी लढणारे सफल योध्दा तुम्ही बना.समाज वा देश उभारणीत महिलांचे त्यागपूर्ण सेवा सर्मपण दिशादर्शक लोकाभिमुख असे राहीले आहे.कृषी विकासातही भरभरुन श्रमाच दान देत काळ्या आईची सेवा करणारी माऊली समृध्द शेतीसाठीची प्रेरक प्रेरणा असल्याचे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी केले.

 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या २४ व्या दीक्षांत समारंभात मान्य झालेल्या पदव्यांचा पदवी वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर तर प्रमुख अतिथी म्हणून वनामकृवि परभणी चे कुलगुरू डॉ इंद्र मणी यांची उपस्थिती लाभली.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले, उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार,परीक्षा विभाग प्रमुख निर्मला जाधव,प्रा.परमेश्वर यादव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन, आयक्यूएसी समन्वयक डॉ.ओमप्रभा लोहकरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रविंद्र इंगळे, वाड्मय विभाग प्रमुख डॉ.आशा गीरी यांची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ आणि कै.सौ. कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संगीत विभागाच्या वतीने विद्यापीठ गीत आणि महाविद्यालय गीत सादर करण्यात आले.संस्थाध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्या हस्ते कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ .वसंतराव भोसले यांनी केले. उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

         शिक्षणातून सुंदर संस्कार होत माणूस विचारी बनतो.चांगल्या वाईटातील फरक कळू लागतो.तुम्ही विचारी, विवेकी, प्रामाणिक, परिश्रमिक, अभ्यासू आहात याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पदवी वितरण प्रसंगी काढले.या वेळी कला शाखा ६२, वाणिज्य शाखा ४८, बीसीए शाखा०६,बी.व्होक १२, एम कॉम ३०, एमएस्सी सीएस ०४ पदवींचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संगीता लोमटे यांनी तर आभार प्रा.डॉ.ओमप्रभा लोहकरे यांनी व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या