💥हिंगोलीचे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे मा,खा.सुभाष वानखेडे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य....!


💥हदगाव तालुका शिवसेनेकडून फटाके फोडून केला आनंद व्यक्त💥

नांदेड दि.20 (अरविंद जाधव) हिंगोली  चे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतव हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेने जुने पदाधिकारी व लोकप्रतिनिधीना सक्रिय केलेले आहे. 


त्यांचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे  तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत घर वापसी झालेली आहे. आज दिनांक 20 रोजी वार बुधवारला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वानखेडे हे शिव बंधनात अडकले आहे.ही माहिती शिवसेनेचे नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिली आहे. आगामी काळात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अनेक पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख आनंदजी जाधव यांनी दिली. सुभाष वानखेडे यांच्या घरवापसीमुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. हिंगोली लोकसभेत पराभव झाल्यानंतर वानखेडे हे नाराज होऊन अगोदर भाजपमध्ये आणि नंतर हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले होते. हदगाव विधानसभेच्या 1995, 1999 व 2004 अशा तिन्ही निवडणुकीत शिवसेनेकडून ते आमदार म्हणून निवडून आले मराठवाड्याचे पक्षप्रतोद म्हणूनही त्यांच्यावर शिवसेनेने जबाबदारी टाकली होती, परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून ते निवडून आले 20014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व पुढाऱ्यांनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांना विधानसभेला शिवसेनेची उमेदवारी देऊ नये असा त्यांचा आग्रह होता. वानखेडे यांची समजूत काढण्यासाठी त्यांना शिवसेनेने 2014 साली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी बहाल केली होती, परंतु त्यांनी शिवसेनेचा बी फॉर्म परत देऊन ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेकडून तत्कालीन जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. आपल्याला पराभूत करणाऱ्या वसमत आणि कळमनुरीच्या माजी आमदारांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार सुभाष वानखेडे नाराज होऊन त्यांनी भाजपची वाट धरली आणि सेनेच्या पुढार्‍यावर कडव्या शब्दात टीका केली. त्यानंतर मधल्या काळात अनेकदा त्यांच्या घर वापसीचे प्रयत्न झाले. परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यात यश येऊ शकले नाही. मुंबईतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी वानखेडे यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाराज करता येत नसल्याने वानखेडे यांच्यासाठी शिवसेनेत त्यावेळी अनुकूल वातावरण नव्हते. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा काही पदाधिकाऱ्यांकडून वानखेडे यांना दिली परंतु ऐनवेळी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे चिडलेल्या वानखेडे यांनी लोकसभेत हेमंत पाटील यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हिंगोलीची निवडणूक लढवली होती. भाजपा असो की काँग्रेस सुभाष वानखेडे यांचे पण कुठेही जमले नाही. केवळ कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची औपचारिकता ते पार पाडत होते, त्यांचे मन शिवसेनेतच रमले होते. परंतु काही जणांनी त्यांच्या परतीचे दोर कापल्यामुळे त्यांनाही शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अधिक रस दाखला नव्हता. राज्य पातळीवरील शिवसेनेत अद्भुत पूर्व फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिलेदारांना एकत्र करण्याचे सत्र सुरू केले आहे. खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचे प्रसाद उमटत आहेत खासदार हेमंत पाटील हे बंडखोराच्या गटात सहभागी झाल्यानंतर काही क्षणातच सुभाष वानखेडे यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सुभाष वानखेडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत होणारी मोठी होणारी फुट टाळता येईल अशी उद्धव ठाकरे आशा आहे.पक्षप्रवेशामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये व नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्ययालयाचे दिसून येत आहे.

यावेळी मातोश्रीवर नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, भुजंग पाटील, माधवराव पावडे,धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे,उमेश मुंडे,आनंदा बोंढारे सह अनेक शिवसेना पदाधिका-यांची उपस्थिती होती. 

हदगांव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्यामराव चव्हाण, युवासेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर, युवा नेते भास्करदादा वानखेडे, हदगांव सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव पाटील, कडवट शिवसैनिक प्रकाशराव जाधव,डॉ. संजय पवार, दत्तरामजी जाधव, विद्यानंद जाधव, अवधूत देवसरकर, दिपक मुधोळकर आदी सह तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांनी सुभाष वानखेडे यांच्या निवास्थानी एकच गर्दी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या