💥'मिशन वात्सल्य'ची जिल्ह्यातील पहीली समीती वाशिम तालुक्यात गठीत...!


💥महिला बालकल्याण अधिकारी कु.प्रियंका गवळी यांचा पुढाकार‘ मिशन वात्सल्य योजना’ 24 सेवा देणार💥 

(फुलचंद भगत)

वाशिम:-मिशन वात्सल्य अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पहिली समीती वाशिम तालुक्यात गठीत करुन दि.१६ सप्टेबर रोजी तहसिलदार,सिडिपिओ सचिव अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली.शासनाची योजना राबवायची म्हणून अंमलबजावणी करण्यापेक्षा मिशन वात्सल्यचा लाभ गरजु आणी अधिकृत लाभार्थ्यांना मीळण्यासाठीचा ठोस आराखडाही करण्यात आला.यासाठी महीला बालकल्याण अधिकारी कु.प्रियंका गवळी यांनी पुढाकार घेतला.

                कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरीकांचे निधन झाले आहे.अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत.तर घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून अनेक महिला एकल/विधवा झालेल्या आहेत.कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करुन देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे.याअंतर्गत आता वाशिम जिल्ह्यातली सुरुवात झालेली आहे.

*ग्रामस्तरीय/ वार्डस्तरीय पथक ग्रामस्तरीय /वॉर्डस्तरीय पथकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या*

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावून अनाथ झालेल्या बालकांना एक रकमी 5 लाख रुपये इतके अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना बालसंगोपन योजनेचा दरमहा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.सदर अनाथ बालकांचे शिक्षण शासकीय संस्थांमध्ये झाल्यास त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने माफ केले असून त्यांची खाजगी शाळेतील शैक्षणिक शुल्क अदा करण्याची सुविधा स्वयंसेवी संस्थांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.याशिवाय शासनाच्या काही विभागामार्फतही अनाथ मुलांसाठी विविध योजना जाहिर झालेल्या आहेत.त्याचप्रमाणे कोविड-१९ मुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.अनेक एकल/विधवा असलेल्या महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्यामुळे त्या शासकीय योजना व कार्यपध्दती याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे शासकीय योजनांपासून अशा महिला व अनाथ बालके वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एकल/ विधवा महिला आणि अनाथ बालके यांच्या कुटूंबियांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारीत “Mission Vatsalya Yojana” ही योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.मिशन वात्सल्य योजना शासन निर्णय कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील कृती दलाची (Task Force) व्याप्ती वाढवून शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा या महिलांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी कृती दलावर सोपविण्यात आलेली आहे.कोविड १९-या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित “मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आलीआहे.कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या “Mission Vatsalya Yojana” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

ग्रामस्तरीय/ वार्डस्तरीय पथक सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे सदर समन्वय समितीमार्फत गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात यावा पथके गावातील/शहरातील एकल/विधवा महिला /अनाथ बालकांच्या कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन योजनांच्या निकषाप्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव तयार करुन तो प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.

*ग्रामस्तरीय /वॉर्डस्तरीय पथकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या*

गाव पातळीवरील /शहरी भागातील पथकाने कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या बालकांच्या तसेच एकल/विधवा महिलांच्या घरी भेट देणे संबंधीत पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्राची पुर्तता /अर्ज भरुन घेणे.योजनांचे निकष तपासून परिपूर्ण प्रस्ताव तयार करणे परिपूर्ण प्रस्ताव तालुका समन्वय समितीस सादर करणे.उपरोक्त योजनांव्यतिरिक्त शासनाच्या इतर विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एकल /विधवा महिला व अनाथ बालके पात्र असतील तर त्या योजनांचाही लाभ त्यांना मिळवून देणेबाबत तालुकास्तरीय समन्वय समितीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.मिशन वात्सल्य अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पहिली समिती वाशिम तालुक्यात गठीत करुन महिला व बालकल्याण अधिकारी कु.प्रियंका गवळी यांच्या पुढाकारातुन पहीली सभा घेण्यात आली.यावेळी तहसिलदार सावळे,गटविकास अधिकारी,तालुका गटशिक्षण अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,तालुका सरंक्षण अधिकारी आणी जिल्हा महिला बालकल्याण विभागातील अधिकार्‍यांची ऊपस्थीती होती. 


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या