💥'मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये'- गृहमंत्री अनिल देशमुख



💥त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल,असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले💥 

 राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये. ते आहेत तिथेच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

 गृहमंत्री देशमुख म्हणाले : “कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाउनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरीत मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी आहे तिथेच रहावे. शासनातर्फे सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची आम्ही हमी देतो.” “फक्त आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी गावी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना वाटेतच अडविले जाईल. इतकी पायपीट करुन गावात जाऊनही गावातील लोकांनी प्रवेश न दिल्यास आपल्यावर अधिक कठीण प्रसंग ओढवू शकतो.तसेच कोरोनाच्या साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढणार, याची जाणीवही गृहमंत्र्यांनी करुन दिली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या